मुख्य सामग्रीवर वगळा

मुलगी पाहायला गेल्यावर नाष्ट्याला पोहेच का देतात, काय आहे कांदेपोह्याचा इतिहास नक्की वाचा.



         आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक नाष्टा म्हणजे कांदेपोहे महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक राज्यात सुद्धा पोहे हाच नाष्टा असतो. लग्नाला मुलगी पाहायला गेलं तिथे सहसा पोहेच दिले जातात. पोह्याचा इतिहास पाहायला गेलं तर असे सांगतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रात लागला. पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रा सह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हेही दावा करतात की पोह्याचा शोध आमच्या इथेच लागला. पण पोहे हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. म्हणून सर्वात जास्त तांदूळ पिकतो आशा ठिकाणीच शोध लागला असेल असंच तज्ज्ञाच मत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदूळ पिकला जातो म्हणून पोहयचा शोध महाराष्ट्रात लागला असावा. 


       पोह्याचा उल्लेख आपण पहिला तर महाभारतात सुद्धा आढळून येतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदामाला त्याचा बायकोने त्याचा पुरचुंडीत पोहेच भरून दिले होते, आणि ते सुदम्याचे पोहे कन्ह्याने आवडीने खाल्ले. चौथी पाचवीत असताना तुम्ही सुदाम्याचे पोहे हा धडा अभ्यासाला असेलच. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्या आधी सुद्धा पोहे बनवले जात असणार हे नक्कीच फक्त त्यावेळी कांडा मिरची घालत नसतील. पुराणातील कथांमध्ये पोह्याचा उल्लेख आढळतो. तर भारतात पुरातन काळात प्रमुख नाश्ता म्हणून ओळखले जायचे. भारतातच नाही तर इंडोनेशिया, कंबोडिया, फिलिपिन्स या देशांमध्ये ही पोहे बनवले जातात फक्त त्याला तिथे नाव वेगळं आहे. इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या सैनिकांना इथलं वातावरण सूट होण्यासाठी त्यानां पण पचण्यासाठी हलका असणारे पोहेच दिले जात असतं. पुण्यातील एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या मुलांच्या नाश्त्याला फक्त हळद घालून केलेले पोहेच नशिबात असतात. तेच पोहे खाऊन आज काही विद्यार्थी मोठे अधिकारी आहेत. पण पुण्यामध्ये लोकं सांबर टाकून, चहा सोबत पोहे खातात. बनवायला सोपे असलेले पोहे मैगी पेक्षा जास्त पंधरा ते वीस मिनिटात बनतात.


       तुमचे लग्न झाले असेल तर तुम्हाला माहीत असेल नसेल झाले तर होईल माहीत. मुलगी पाहायला गेल्यावर पोहेच दिले जातात. कारण पोहे हे बनवायला सोपे आणि चविष्ट आणि पोहे बिघडण्याची शक्यता कमी असते शक्यतो बिघडत नाहीत आणि जरी थोडेफार बिघडले ओळखू येत नाहीत. आणि पाहुण्यांना सांगता येत पोहे मुलीने बनवले. मुलीला पाहायला आलेली मंडळीही खुश होतात. त्यामुळे लग्नाला मुलगी पाहायला गेल्यावर पोहे करतात. पण आत्ताच्या काळात विविध प्रकारचे पोहे आढळतात

मारवाड़ी पोहे

कांदा पोहे

बटाटा पोहे

गुजराती पोहे

आलू पोहे

इंदौरी पोहे


पोहे खाण्याचे फायदे:

● सकाळी पोह्याचा नाश्ता केला तर तुम्हाला ताकत येते त्यामुळे दिवसभर काम करू शकता.

● कांदेपोहे खायला चविष्ट आणि पोटासाठी हलका पदार्थ आहे.

● कांदेपोहे खाल्यानंतर ते आपल्या पोटात गेल्यावर अजून त्याचा आकार वाढतो, त्यामुळे पोट गच्च राहते.

● सकाळी नाश्त्यासाठी उत्तम उत्तम आहार समजला जातो.

● पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्नस पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि डी हे घटक प्रामुख्याने शरीरासाठी चांगले आहेत.

● वजन कमी करण्यासाठी पर्यायी आहार.


अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, नोकरी अपडेट, आरोग्य, मनोरंजन माहितीसाठी व्हाट्सऍपवर जॉईन करा. येथे क्लीक करा









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022

महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022 Get Free Daily Job Update on Whatsapp Click Here एकूण जागा: २५००+  शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी डाकसेवाक- १० वी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेमार्फत, संगणकाची प्राथमिक माहिती पदे: पोस्टमन, चालक(Driver), डाकसेवाक(GDS) वय : कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस नोकरीचे स्थान: मुंबई अर्ज शुल्क:  ओबीसी/ पुरुष/ तृतीयपंथी पुरुष- १००₹ महिला/ तृतीयपंथी महिला/ अजा/ अज/आणि इतर-०० परीक्षा पद्धत:  ●डाक सेवक- सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी स्थानिक भाषेचे ज्ञान- एकूण १०० गुणांची चाचणी २ तास वेळेत पूर्ण करावी लागेल. ●ड्राइवर- सामान्य गणित, अंतर्वक्र बाह्यवक्र आरसा याबद्दलची माहिती असणे आवश्यक. चार चाकी वाहन चालवण्याची चाचणी. ऑनलाईन अर्जप्रक्रिया:  ● सर्वात प्रथम तुम्ही पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. ●उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. ●संकेतस्थळावर शेवटची नोटीस पहावी त्यामध्ये "महाराष्ट्...

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.

Get Daily Update on Whatsapp      पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.        येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे.  कोण अर्ज करू शकतो/ पात्रता:    ● अर्जदार भारतीय नागरिक असावा. ● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे. ● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा. CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते ८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी जमिनीच्या संबंधित नियम: ● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल. ●घरातील सदस्यांच्या नावावर असेल त...

आत्ताच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक किती फायद्याची आणि किती तोट्याची Gold Investment Details

Get Daily Update on Whatsapp        सध्याच्या जमान्यात गुंतवणूक म्हणजे क्रिप्टो करन्सी आणि शेअर बाजार हे दोनच पर्याय जास्ती लोकांना माहीत आहे किंवा जास्त फायदेशीर आहेत अशी लोकांचा समज आहे. हेच तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते समजूनच घ्यायच नसत. त्यांच्या डोक्यात एकाच बसलेलं असतं म्हणजे गुंतवणूक म्हणजे सोन जसं आपलं गणितं पक्के तसं त्यांचं त्यांचं सुद्धा पक्के असतं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोन आजही शेअर मार्केट आणि क्रिप्टोच्या जमान्यात अजून ही पाय रोवून उभे आहे.        पहिली जशी सोन्यामध्ये गुंतवणूक होत होती. तशी आत्ताच्या जमान्यात का होत नाही. आत्ता च्या घडीला सोन्यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते का हेच आपण पाहूया.        ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आपण पाहिलं की सोन्याची दुकान बंद होती तसेच सर्व मार्केटसुद्धा बंदच होते. ज्याच्याजवळ सोनं होतं तो ते विकून थोडेफार पैसे हवे असतील तर तो विकुही शकत नव्हता, आणि ज्याला सोन खरेद करायचं तो खरेदी सुद्धा करू शकत नव्हता. त्यावेळी ...